मतदार राणी........
आज सगळीकडे लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय. छान वातावरण आहे सगळीकडे. टी. व्हि चॅनेल्सवर बातम्यांचा भडिमार चालू आहे. सकाळी सकाळी पहिल्यांदा वोटिंग कोणी केलं हे सांगणारे फोटो व्हॉटस अॅपवर पडतायत. एकदंरच सोशल मिडियामुळे निवडणूकसुध्दा इव्हेंट झालीय.
कोण निवडून येईल, कोणाची सत्ता येईल हे लवकरच कळेल. पण मला आज खूप वेगळा अनुभव आला. आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच घडणा-या कोणत्याही वेळी जी भावना मनात असते ना तीच आज होती. म्हणजे हे माझं पहिलं मतदान नव्हतं , तरीही..........
म्हणजे कॉलेजमधला पहिला दिवस, जत्रेतल्या चक्रात बसतानाचा क्षण, गाडी शिकल्यानंतर पहिल्यांदा घेतलेली राईड, दाखवण्याचे म्हणजे चहा पोह्याचे कार्यक्रम, माझ्या पिल्लाचा जन्म, आकाशवाणीमध्ये पहिल्यांदा केलेली उद्घोषणा, कलापिनीच्या स्टेजवर केलेलं पहिलं निवेदन , अनुपम खेर यांच्यासारख्या दिग्गजानी केलेलं कौतुक ...... या आणि अशा ब-याच प्रसंगी पोटात येणारा गोळा आज सुध्दा आला. हे सगळे प्रसंग चांगलेच होते. त्यामुळे आज पोटात आलेला गोळा भीतीचा नाही तर उत्सुकतेचा होता.
आज मतदान करायला गेल्यावर मी आजच्या सिनेमाची म्हणजे १५ ऑक्टोबर या दिवसाच्या सिनेमाची हिरॉईन आहे की काय असं फिलींग येत होतं. खरं म्हणजे आपल्याकडे कोणी बघत नसत. पण उगाच असं वाटत होतं की यस्स... सगळे आपल्याकडेच बघतायत. म्हणजे मतदाराला मतदार राजा म्हणतात ना, तशी मी आज मतदार राणी झाले होते. एखादा सिनेमा पाहून बाहेर पडलं की त्या सिनेमाची हिरॉईन मीच आहे की काय असं उगाच वाटत. तुम्हाला वाटत का नाही मला माहिती नाही. किंवा मुलांना मीच हिरो आहे असं वाटतं. तस आज वाटत होतं. मतदान केंद्रात जाताना अगदी गर्वानी मान ताठ झाली होती. बोटावर असलेली शाई पुसली जाऊ नये म्हणून नंतर कितीतरी वेळ बोट अगाच उभं राहिलं होतं. मी तर अगदी फुंकर मारून मारून शाई सुकवली.
निवडणूक आणि मतदान हे काही नवीन नाहीये खरं तर. पण का कोणास ठाऊक गेल्या काही महिन्यांमध्ये मतदान करण्याचा खरा उद्देश समजलाय असं वाटतं. आपल्या मताला किती किंमत आहे हे समजल्यासारखं वाटतयं. मतदान केंद्रावर लागलेल्या रांगा हेच तर सांगतात. सत्ता कोणाची येईल माहिती नाही. पण एक जागरूक नागरिक म्हणून आपण आपलं कर्तव्य करण्याचा प्रयत्न करूया. जर ही लोकांनी, लोकांसाठी, आणि लोकांकरवी निवडलेली कार्यपध्दती आहे तर ती तशी जाणवूदे. सरकार करेल काय ते, आपल्याला काय करायचय ? अशी बघ्याची भूमिका सोडायला हवी. सक्रियपणे आपापल्या परीने काय करता येईल ते केलं पाहिजे. कोणताही एक माणूस चमत्कार घडवून सगळ बदलू शकणार नाही. आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं तर उन्नतीकडे वाटचाल अशक्य नाही.
मतदार राजा किंवा राणी म्हणून आलेला हा फील कायम टिकवूया.... आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी एक आदर्श लोकशाही प्रणाली जिवंत ठेवण्याची जबाबदारी घेऊया....
आज सगळीकडे लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय. छान वातावरण आहे सगळीकडे. टी. व्हि चॅनेल्सवर बातम्यांचा भडिमार चालू आहे. सकाळी सकाळी पहिल्यांदा वोटिंग कोणी केलं हे सांगणारे फोटो व्हॉटस अॅपवर पडतायत. एकदंरच सोशल मिडियामुळे निवडणूकसुध्दा इव्हेंट झालीय.
कोण निवडून येईल, कोणाची सत्ता येईल हे लवकरच कळेल. पण मला आज खूप वेगळा अनुभव आला. आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच घडणा-या कोणत्याही वेळी जी भावना मनात असते ना तीच आज होती. म्हणजे हे माझं पहिलं मतदान नव्हतं , तरीही..........
म्हणजे कॉलेजमधला पहिला दिवस, जत्रेतल्या चक्रात बसतानाचा क्षण, गाडी शिकल्यानंतर पहिल्यांदा घेतलेली राईड, दाखवण्याचे म्हणजे चहा पोह्याचे कार्यक्रम, माझ्या पिल्लाचा जन्म, आकाशवाणीमध्ये पहिल्यांदा केलेली उद्घोषणा, कलापिनीच्या स्टेजवर केलेलं पहिलं निवेदन , अनुपम खेर यांच्यासारख्या दिग्गजानी केलेलं कौतुक ...... या आणि अशा ब-याच प्रसंगी पोटात येणारा गोळा आज सुध्दा आला. हे सगळे प्रसंग चांगलेच होते. त्यामुळे आज पोटात आलेला गोळा भीतीचा नाही तर उत्सुकतेचा होता.
आज मतदान करायला गेल्यावर मी आजच्या सिनेमाची म्हणजे १५ ऑक्टोबर या दिवसाच्या सिनेमाची हिरॉईन आहे की काय असं फिलींग येत होतं. खरं म्हणजे आपल्याकडे कोणी बघत नसत. पण उगाच असं वाटत होतं की यस्स... सगळे आपल्याकडेच बघतायत. म्हणजे मतदाराला मतदार राजा म्हणतात ना, तशी मी आज मतदार राणी झाले होते. एखादा सिनेमा पाहून बाहेर पडलं की त्या सिनेमाची हिरॉईन मीच आहे की काय असं उगाच वाटत. तुम्हाला वाटत का नाही मला माहिती नाही. किंवा मुलांना मीच हिरो आहे असं वाटतं. तस आज वाटत होतं. मतदान केंद्रात जाताना अगदी गर्वानी मान ताठ झाली होती. बोटावर असलेली शाई पुसली जाऊ नये म्हणून नंतर कितीतरी वेळ बोट अगाच उभं राहिलं होतं. मी तर अगदी फुंकर मारून मारून शाई सुकवली.
निवडणूक आणि मतदान हे काही नवीन नाहीये खरं तर. पण का कोणास ठाऊक गेल्या काही महिन्यांमध्ये मतदान करण्याचा खरा उद्देश समजलाय असं वाटतं. आपल्या मताला किती किंमत आहे हे समजल्यासारखं वाटतयं. मतदान केंद्रावर लागलेल्या रांगा हेच तर सांगतात. सत्ता कोणाची येईल माहिती नाही. पण एक जागरूक नागरिक म्हणून आपण आपलं कर्तव्य करण्याचा प्रयत्न करूया. जर ही लोकांनी, लोकांसाठी, आणि लोकांकरवी निवडलेली कार्यपध्दती आहे तर ती तशी जाणवूदे. सरकार करेल काय ते, आपल्याला काय करायचय ? अशी बघ्याची भूमिका सोडायला हवी. सक्रियपणे आपापल्या परीने काय करता येईल ते केलं पाहिजे. कोणताही एक माणूस चमत्कार घडवून सगळ बदलू शकणार नाही. आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं तर उन्नतीकडे वाटचाल अशक्य नाही.
मतदार राजा किंवा राणी म्हणून आलेला हा फील कायम टिकवूया.... आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी एक आदर्श लोकशाही प्रणाली जिवंत ठेवण्याची जबाबदारी घेऊया....
No comments:
Post a Comment