उत्सव वेदनेचा............
डोळ्यांमध्ये जमते पाणी , कशासाठी कळत नाही.... ऊर भरल्या उसाशाला ....कुठेच वाट मिळत नाही......... प्रवीण दवणे यांच्या अलगुजमधल्या या ओळी..... काही वेळा अशी मनःस्थिती आपली सुध्दा होते. डोळे भरून येतात.... का? कुणासाठी ? काहीच कळत नाही. व्यवहारी जगातले नियम या भावनांना समजू शकत नाहीत. सगळ काही व्यवस्थित असणारी ही व्यक्ति नेमक्या कोणत्या कारणानी व्याकुळ झालीय तेच कळत नाही. पाडगावकरांच्या या ओळी मनात रूंजी घालतात..... कुठुनी हे येति सूर लावितात मज हुरहुर, फडफडतो तडफडतो प्राणविहग पंजरी.......
अमुक एक कारण नसत या उदासीला..... ही उदासी आपलीच, आपल्या मनातली... काही वेळा , काही गोष्टी आपल्या मनातच ठेवलेल्या ब-या.... कारण कोणालाही या भावना कळणं अशक्यच असतं. कोणत्याही मोठ्या संकटांशी सामना करणारे आपण असे गलीतगात्र का झालोय? हेच मुळी कळत नाही....
पण एकदम एक विचार डोक्यात चमकून जातो.. जगण्यासाठी आवश्यक असणारी उर्जा मिळवण्यासाठीच अडचणी असतात ना....... जेव्हा सगळं संपून गेलय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नव्यानी काहीतरी सुरू करण्याची.... खरं आहे हे..... वेदना तर आहेच...... ती रहाणारच..... पण या वेदनेचा उत्सव करता आला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीला अंत आहे.... सुखाचे क्षण जसे फार काळ रहात नाहीत ... तसंच ही उदासी पण संपेल... काहीतरी मिळवायचय हा ध्यास ही उदासी घालवण्यासाठी उपयोगी पडतो. कदाचितच..... पण प्रयत्न करायला काय हरकत आहे.... कारण न लढता जगण्यापेक्षा लढून जगलेलं बरं.... काय सांगाव ज्या कारणानी आपण दुःखी झालोय ते कारणच आपल्या जगण्याचा आधार बनेल... ध्यासही असा असावा जो वेदनेला संजीवन देईल....
डोळ्यांमध्ये जमते पाणी , कशासाठी कळत नाही.... ऊर भरल्या उसाशाला ....कुठेच वाट मिळत नाही......... प्रवीण दवणे यांच्या अलगुजमधल्या या ओळी..... काही वेळा अशी मनःस्थिती आपली सुध्दा होते. डोळे भरून येतात.... का? कुणासाठी ? काहीच कळत नाही. व्यवहारी जगातले नियम या भावनांना समजू शकत नाहीत. सगळ काही व्यवस्थित असणारी ही व्यक्ति नेमक्या कोणत्या कारणानी व्याकुळ झालीय तेच कळत नाही. पाडगावकरांच्या या ओळी मनात रूंजी घालतात..... कुठुनी हे येति सूर लावितात मज हुरहुर, फडफडतो तडफडतो प्राणविहग पंजरी.......
अमुक एक कारण नसत या उदासीला..... ही उदासी आपलीच, आपल्या मनातली... काही वेळा , काही गोष्टी आपल्या मनातच ठेवलेल्या ब-या.... कारण कोणालाही या भावना कळणं अशक्यच असतं. कोणत्याही मोठ्या संकटांशी सामना करणारे आपण असे गलीतगात्र का झालोय? हेच मुळी कळत नाही....
पण एकदम एक विचार डोक्यात चमकून जातो.. जगण्यासाठी आवश्यक असणारी उर्जा मिळवण्यासाठीच अडचणी असतात ना....... जेव्हा सगळं संपून गेलय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नव्यानी काहीतरी सुरू करण्याची.... खरं आहे हे..... वेदना तर आहेच...... ती रहाणारच..... पण या वेदनेचा उत्सव करता आला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीला अंत आहे.... सुखाचे क्षण जसे फार काळ रहात नाहीत ... तसंच ही उदासी पण संपेल... काहीतरी मिळवायचय हा ध्यास ही उदासी घालवण्यासाठी उपयोगी पडतो. कदाचितच..... पण प्रयत्न करायला काय हरकत आहे.... कारण न लढता जगण्यापेक्षा लढून जगलेलं बरं.... काय सांगाव ज्या कारणानी आपण दुःखी झालोय ते कारणच आपल्या जगण्याचा आधार बनेल... ध्यासही असा असावा जो वेदनेला संजीवन देईल....
👌
ReplyDelete