आठवणी दाटतात...........
आठवणी दाटतात ! धुके जसे पसरावे
जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे...........
विविध भारतीला हे जुनं मराठी गाणं लागलं होतं. ''आठवण'' हा शब्द उच्चारताच कितीतरी आठवणी जाग्या होतात........... आठवण ही फार छान देणगी दिलीय देवानी आपल्याला. भूतकाळात घडून गेलेल्या चांगल्या वाईट आठवणी पुन्हा एकदा त्याच प्रसंगाची, घटनेची अनुभूती देतात.
अगदी लहानपणणापासून आत्तापर्यंत घडलेल्या ब-या वाईट प्रसंगांच्या आठवणी मनाला दुःख आणि आनंद देतात. काही आठवणी नकोशा वाटतात, तर काही हव्याशा.... आपली माणसाची जात ना मोठी चतुर... चांगलं ते हवं आणि वाईट मात्र नको.... नाण्याला दोन बाजू असतात वगैरे हे सगळं बोलतो आपण. पण वाईट किंवा मनाला वेदना देणा-या आठवणी नको असतात आपल्याला. या अशा आठवणींमधून सुध्दा बरचं काही शिकायला मिळतं. त्या वाईट आठवणी नकोत म्हणून त्या वस्तू, त्या जागा, ते रस्ते सगळं टाळतो आपण. असं करूनही ती आठवण काही पाठ सोडत नाही. मग त्यापासून पळून काय फायदा.....
हव्याश्या आठवणी मनाला तरल अनुभूती देतात. लहानपणीच्या खट्याळ, तरूण वयातल्या गोड गुलाबी , पहिल्यांदा मिळालेला पगार, पहिल्यांदा आपल्या पैशानी घेतलेल्या गोष्टी, मैत्रिणींची पत्रं... मी तर आजही माझ्या एका मैत्रिणीचं, मेघनाचं पत्र जपून ठेवलय. ते पत्र पुन्हा पुन्हा वाचते मी वेड्यासारखं.... किती छान आठवणी आहेत शाळेमधल्या..... आम्हा बायकांच्या बाबतीत एक गोड आठवण म्हणजे............ लग्न ..... नाही हो.......... काहीही काय ? ती काय सुखद आठवण आहे का ? या आठवणीपेक्षा आई झाल्याचा क्षण ही आठवण फारच छान........मुलं कितीही मोठं झालं तरी ती आठवण येताच नकळतपणे, '' माझं पिल्लू गं ते ''.... असे शब्द बाहेर पडतात...... या सुखद आठवणी हव्याशा वाटतात.
गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनात सांगतात, एकच वस्तू एकाला सुखरूप वाटते तर दुस-याला दुःखरूप वाटते. म्हणजे ती मुळात ती सुखरुप नाही आणि दुःखरूपही नाही. जी गोष्ट आज सुखरूप वाटते, ती उद्या वाटेलच असं नाही. संकट आलं की पूर्वीच्या गोष्टी, नाती, आठवणी गोड लागत नाहीत. हा सगळा कल्पनेचाच खेळ नाही का ?
जरी हा कल्पनेचा खेळ असला तरीदेखील चांगल्या वाईट आठवणी येतातच. त्या मनाला सुख दुःख देतातच. आपल्या आयुष्यातून आठवणच वजा केली तर काय उरतं ? काहीच नाही. वर्तमानकाळात जगणं हे खरं तर आयडियल आहे. पण आपण मनुष्य आहोत. त्यामुळे भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही काळांची सफर करणं अगदी सहाजिक आहे. या सफरीत येणा-या आठवणींना असं म्हणावसं वाटतं.....
आठवणींनो उघडा डोळे, आसवांचे अमृत प्याले
आठवणींनो नयनी बघु द्या, सुखाचे ते क्षण जे निमाले......
आठवणी दाटतात ! धुके जसे पसरावे
जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे...........
विविध भारतीला हे जुनं मराठी गाणं लागलं होतं. ''आठवण'' हा शब्द उच्चारताच कितीतरी आठवणी जाग्या होतात........... आठवण ही फार छान देणगी दिलीय देवानी आपल्याला. भूतकाळात घडून गेलेल्या चांगल्या वाईट आठवणी पुन्हा एकदा त्याच प्रसंगाची, घटनेची अनुभूती देतात.
अगदी लहानपणणापासून आत्तापर्यंत घडलेल्या ब-या वाईट प्रसंगांच्या आठवणी मनाला दुःख आणि आनंद देतात. काही आठवणी नकोशा वाटतात, तर काही हव्याशा.... आपली माणसाची जात ना मोठी चतुर... चांगलं ते हवं आणि वाईट मात्र नको.... नाण्याला दोन बाजू असतात वगैरे हे सगळं बोलतो आपण. पण वाईट किंवा मनाला वेदना देणा-या आठवणी नको असतात आपल्याला. या अशा आठवणींमधून सुध्दा बरचं काही शिकायला मिळतं. त्या वाईट आठवणी नकोत म्हणून त्या वस्तू, त्या जागा, ते रस्ते सगळं टाळतो आपण. असं करूनही ती आठवण काही पाठ सोडत नाही. मग त्यापासून पळून काय फायदा.....
हव्याश्या आठवणी मनाला तरल अनुभूती देतात. लहानपणीच्या खट्याळ, तरूण वयातल्या गोड गुलाबी , पहिल्यांदा मिळालेला पगार, पहिल्यांदा आपल्या पैशानी घेतलेल्या गोष्टी, मैत्रिणींची पत्रं... मी तर आजही माझ्या एका मैत्रिणीचं, मेघनाचं पत्र जपून ठेवलय. ते पत्र पुन्हा पुन्हा वाचते मी वेड्यासारखं.... किती छान आठवणी आहेत शाळेमधल्या..... आम्हा बायकांच्या बाबतीत एक गोड आठवण म्हणजे............ लग्न ..... नाही हो.......... काहीही काय ? ती काय सुखद आठवण आहे का ? या आठवणीपेक्षा आई झाल्याचा क्षण ही आठवण फारच छान........मुलं कितीही मोठं झालं तरी ती आठवण येताच नकळतपणे, '' माझं पिल्लू गं ते ''.... असे शब्द बाहेर पडतात...... या सुखद आठवणी हव्याशा वाटतात.
गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनात सांगतात, एकच वस्तू एकाला सुखरूप वाटते तर दुस-याला दुःखरूप वाटते. म्हणजे ती मुळात ती सुखरुप नाही आणि दुःखरूपही नाही. जी गोष्ट आज सुखरूप वाटते, ती उद्या वाटेलच असं नाही. संकट आलं की पूर्वीच्या गोष्टी, नाती, आठवणी गोड लागत नाहीत. हा सगळा कल्पनेचाच खेळ नाही का ?
जरी हा कल्पनेचा खेळ असला तरीदेखील चांगल्या वाईट आठवणी येतातच. त्या मनाला सुख दुःख देतातच. आपल्या आयुष्यातून आठवणच वजा केली तर काय उरतं ? काहीच नाही. वर्तमानकाळात जगणं हे खरं तर आयडियल आहे. पण आपण मनुष्य आहोत. त्यामुळे भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही काळांची सफर करणं अगदी सहाजिक आहे. या सफरीत येणा-या आठवणींना असं म्हणावसं वाटतं.....
आठवणींनो उघडा डोळे, आसवांचे अमृत प्याले
आठवणींनो नयनी बघु द्या, सुखाचे ते क्षण जे निमाले......
Nice article Vinaya ... memories always make us nostalgic ...
ReplyDeleteMemory is like a deep and vast ocean. If we know how to swim, we are safe on the shore else it will eat us up.
Good memories are to be used as a morale booster and bad memories are to used as a teacher ....
Enjoy life ...
Sachin Bhide UAE
👌
ReplyDelete