जनप्रियत्व .....
अपेक्षा हे सगळ्या दुःखांच मूळ असं म्हटलं जातं. पण तरी आपण त्या ठेवतोच. अपेक्षेप्रमाणे झालं तर आनंद होतो. पण अपेक्षेप्रमाणे झालं नाही तर वाईट वाटतं. हा माणसाचा स्वभाव असतो. एखाद्या व्यक्तिवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास दाखवला आणि ती व्यक्ती अपेक्षेप्रमाणे वागली नाही तर त्रास होतो. पण नीट विचार केला तर लक्षात येतं की, अपेक्षा आपली असते. ती व्यक्ती तिच्या स्वतःच्या अपेक्षेप्रमाणेच वागते. त्यामुळे त्रास तरी करून का घ्यायचा ? अपेक्षित सुख - दुःखापेक्षा , अनपेक्षित सुख दुःखात माणसाची खरी कसोटी लागते. अनपेक्षित सुखाचा काही प्रॉब्लेम नसतो. कारण ते हवहवसं वाटतं. पण अनपेक्षित दुःखानी माणूस कोलमडतो. या सगळ्यातून सही सलामत सुटणं वाटतं तितकं सोप नाही.
या समस्येवर देखील प्रेमानी मात करता येते. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे ? पण या सगळ्यावर रामबाण औषध म्हणजे प्रेमच. प्रेमानी जग जिंकता येतं. संतांकडून जनप्रियत्व शिकावं. कारण जो लोकांना आवडतो तोच देवाला आवडतो असं म्हटलं जातं. जो निःस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल. आपल्यापुरते न पहाता जगण्याचा प्रयत्न केला की हे सहज जमेल. प्रेमाची उत्कट अवस्था म्हणजे भक्ती. अशी भक्ती ज्याच्या मनात असेल त्याला असं वागणं सहज शक्य आहे. ज्या व्यक्तीवर, भावनेवर आपलं प्रेम आहे तेच प्रेम आपल्या वागण्या - बोलण्यातही हवं. प्रत्येक माणूस कशावर ना कशावर प्रेम करतोच ना... कोणाचं व्यक्तीवर प्रेम, कोणाचं पैशावर, कोणाचं प्रतिष्ठेवर प्रेम तर कोणाचं कर्तृत्वावर, कोणाचं जातीवर प्रेम तर कोणाचं धर्मावर, कोणाचं स्वतःमधल्या सूडाच्या भावनेवर प्रेम तर कोणाचं स्वतःमधल्या क्षमाशील वृत्तीवर , कोणाचं निसर्गावर प्रेम तर कोणाचं देवावर, कोणाचं कलेवर प्रेम तर कोणाचं कामावर.... मग तेच प्रेम , तीच भावना सर्वत्र दिसायला लागली की अपेक्षा, दुःख, द्वेष, सूड या भावनांना काही अर्थ तरी उरतो का?
आपलं कशावरच प्रेम नसेल तर मग कठीण आहे... सॉरी सोप्प आहे. मग आपण हवे नकोपणाच्या पुढे गेलोय असं म्हणायला हरकत नाही. मग आपल्या नजरेत सगळीकडे समता नांदायलाच हवी. अपेक्षा, दुःख , वेदना या गोष्टींच्या पुढे नेणारी अवस्था आहे ही. प्रेमात असाल किंवा प्रेमात नसाल काही प्रॉब्लेम नाही. जनप्रियत्व मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. संतांसारखं जनप्रियत्व मिळवण्यासाठी आपल्या विचारांमध्ये परिवर्तन येण्याची गरज आहे. आपण तरी सगऴ्यांचं भलं व्हावं असा विचार करावा. समोरच्यानी काय करायचं हा त्याचा प्रश्न आहे. जशास तसे न वागता मला हवे तसे म्हणजे प्रेमानी वागायला काय हरकत आहे ? कारण प्रत्येकाला वाटतं की समोरच्यानी चांगलं वागावं, मी मात्र हवं तसं वागेन... This is not fair boss...
प्रेम (कशावरही आणि कोणावरही) करणा-यांना अपेक्षाभंगाच्या दुःखाचा सामना करणं सोप आहे. प्रेम न करणा-यांचा प्रश्नच नाही. कारण त्यांना या दुःखाचा सामना करण्याची वेळ येतच नाही. साधं, सोप्प जगण्याचा प्रयत्न, आनंद आणि समाधान नक्कीच देईल. प्रयत्न करूया ?
अपेक्षा हे सगळ्या दुःखांच मूळ असं म्हटलं जातं. पण तरी आपण त्या ठेवतोच. अपेक्षेप्रमाणे झालं तर आनंद होतो. पण अपेक्षेप्रमाणे झालं नाही तर वाईट वाटतं. हा माणसाचा स्वभाव असतो. एखाद्या व्यक्तिवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास दाखवला आणि ती व्यक्ती अपेक्षेप्रमाणे वागली नाही तर त्रास होतो. पण नीट विचार केला तर लक्षात येतं की, अपेक्षा आपली असते. ती व्यक्ती तिच्या स्वतःच्या अपेक्षेप्रमाणेच वागते. त्यामुळे त्रास तरी करून का घ्यायचा ? अपेक्षित सुख - दुःखापेक्षा , अनपेक्षित सुख दुःखात माणसाची खरी कसोटी लागते. अनपेक्षित सुखाचा काही प्रॉब्लेम नसतो. कारण ते हवहवसं वाटतं. पण अनपेक्षित दुःखानी माणूस कोलमडतो. या सगळ्यातून सही सलामत सुटणं वाटतं तितकं सोप नाही.
या समस्येवर देखील प्रेमानी मात करता येते. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे ? पण या सगळ्यावर रामबाण औषध म्हणजे प्रेमच. प्रेमानी जग जिंकता येतं. संतांकडून जनप्रियत्व शिकावं. कारण जो लोकांना आवडतो तोच देवाला आवडतो असं म्हटलं जातं. जो निःस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल. आपल्यापुरते न पहाता जगण्याचा प्रयत्न केला की हे सहज जमेल. प्रेमाची उत्कट अवस्था म्हणजे भक्ती. अशी भक्ती ज्याच्या मनात असेल त्याला असं वागणं सहज शक्य आहे. ज्या व्यक्तीवर, भावनेवर आपलं प्रेम आहे तेच प्रेम आपल्या वागण्या - बोलण्यातही हवं. प्रत्येक माणूस कशावर ना कशावर प्रेम करतोच ना... कोणाचं व्यक्तीवर प्रेम, कोणाचं पैशावर, कोणाचं प्रतिष्ठेवर प्रेम तर कोणाचं कर्तृत्वावर, कोणाचं जातीवर प्रेम तर कोणाचं धर्मावर, कोणाचं स्वतःमधल्या सूडाच्या भावनेवर प्रेम तर कोणाचं स्वतःमधल्या क्षमाशील वृत्तीवर , कोणाचं निसर्गावर प्रेम तर कोणाचं देवावर, कोणाचं कलेवर प्रेम तर कोणाचं कामावर.... मग तेच प्रेम , तीच भावना सर्वत्र दिसायला लागली की अपेक्षा, दुःख, द्वेष, सूड या भावनांना काही अर्थ तरी उरतो का?
आपलं कशावरच प्रेम नसेल तर मग कठीण आहे... सॉरी सोप्प आहे. मग आपण हवे नकोपणाच्या पुढे गेलोय असं म्हणायला हरकत नाही. मग आपल्या नजरेत सगळीकडे समता नांदायलाच हवी. अपेक्षा, दुःख , वेदना या गोष्टींच्या पुढे नेणारी अवस्था आहे ही. प्रेमात असाल किंवा प्रेमात नसाल काही प्रॉब्लेम नाही. जनप्रियत्व मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. संतांसारखं जनप्रियत्व मिळवण्यासाठी आपल्या विचारांमध्ये परिवर्तन येण्याची गरज आहे. आपण तरी सगऴ्यांचं भलं व्हावं असा विचार करावा. समोरच्यानी काय करायचं हा त्याचा प्रश्न आहे. जशास तसे न वागता मला हवे तसे म्हणजे प्रेमानी वागायला काय हरकत आहे ? कारण प्रत्येकाला वाटतं की समोरच्यानी चांगलं वागावं, मी मात्र हवं तसं वागेन... This is not fair boss...
प्रेम (कशावरही आणि कोणावरही) करणा-यांना अपेक्षाभंगाच्या दुःखाचा सामना करणं सोप आहे. प्रेम न करणा-यांचा प्रश्नच नाही. कारण त्यांना या दुःखाचा सामना करण्याची वेळ येतच नाही. साधं, सोप्प जगण्याचा प्रयत्न, आनंद आणि समाधान नक्कीच देईल. प्रयत्न करूया ?