माझा दादू......
आजही तो दिवस आठवतो जेव्हा तो माझ्या आयुष्यात आला. माझ्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी. तो आला आणि माझं जग बदललं. आता मागे वळून पहाताना तो दिवस आजही चेहे-यावर आनंद आणतो. किती खुष होते मी त्या दिवशी, जेव्हा माझं बाळ माझ्या हातात होतं. माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता तो. मला मुळातच छोट्या पिल्लांची खूप आवड. त्यात आपल्याच हातात इवल्याशा त्याला पाहून मी अक्षरशः वेडी झाले होते. त्याचं पहिल्यांदा पालथं पडणं, चालणं, बोलणं, शाळेचा पहिला दिवस , स्टेजवर पहिल्यांदा उभं रहाणं हे सगळं मी खूप एन्जॉय केलं. त्यासाठी बांधिलकीची नोकरी केली नाही.
मला चांगल आठवतय . तो शाळेत जाताना त्याच्याबरोबर पावसाच्या डबक्यात पाय आपटताना मीदेखील लहान व्हायचे. त्याच्या बोबड्या बोलांनी मला कितीतरी सुख दिलं. माझं पिल्लू आज माझ्या खांद्यापेक्षा मोठ्ठ झालय.त्याच्या जन्माच्या वेळी जी हुरहुर मनात होती तीच आत्ता आहे. त्याचं कारण ,आज त्याचं जग बदलेल असा दिवस आहे. अर्थात त्याच्या जगाबरोबर माझंही. आज त्याचा दहावीचा निकाल लागला. त्याला 89 टक्के पडले. ते मार्क्स किती आहेत? त्याचं करियर कसं असेल ? याबाबत मला आत्ता अजिबात टेन्शन नाही. फक्त एकच इच्छा आहे , त्यानी चांगला माणूस व्हावं. आपल्या संवेदना जागृत ठेवून जगावं. कारण करियर, पैसा या गोष्टी मिळतातच. पण संवेदना जागृत ठेवणं गरजेचं आहे. कारण संवेदनशील माणूस कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.
आज तो खुप खुष आहे. त्याला चांगले मार्क्स पडलेत. सगळेच खुष आहेत. त्याच्या आयुष्यात त्याला खुप समाधान मिळो. तो सदैव आनंदी राहो . हाच माझा आशिर्वाद आणि शुभेच्छा. आज पुन्हा एकदा माझ्यापासून लांब गेलेल्या माझ्या सगळ्या जिवलगांची आठवण येतीय. मला खात्री आहे ते सगळे जिथे आहेत तिथून त्याला आशिर्वाद देत असणार.... प्रणव पुन्हा एकदा अभिनंदन... खुप मोठा हो. बदललेल्या या नव्या जगात तुला कणखरपणे उभं रहाता यावं ही सदिच्छा.....
आजही तो दिवस आठवतो जेव्हा तो माझ्या आयुष्यात आला. माझ्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी. तो आला आणि माझं जग बदललं. आता मागे वळून पहाताना तो दिवस आजही चेहे-यावर आनंद आणतो. किती खुष होते मी त्या दिवशी, जेव्हा माझं बाळ माझ्या हातात होतं. माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता तो. मला मुळातच छोट्या पिल्लांची खूप आवड. त्यात आपल्याच हातात इवल्याशा त्याला पाहून मी अक्षरशः वेडी झाले होते. त्याचं पहिल्यांदा पालथं पडणं, चालणं, बोलणं, शाळेचा पहिला दिवस , स्टेजवर पहिल्यांदा उभं रहाणं हे सगळं मी खूप एन्जॉय केलं. त्यासाठी बांधिलकीची नोकरी केली नाही.
मला चांगल आठवतय . तो शाळेत जाताना त्याच्याबरोबर पावसाच्या डबक्यात पाय आपटताना मीदेखील लहान व्हायचे. त्याच्या बोबड्या बोलांनी मला कितीतरी सुख दिलं. माझं पिल्लू आज माझ्या खांद्यापेक्षा मोठ्ठ झालय.त्याच्या जन्माच्या वेळी जी हुरहुर मनात होती तीच आत्ता आहे. त्याचं कारण ,आज त्याचं जग बदलेल असा दिवस आहे. अर्थात त्याच्या जगाबरोबर माझंही. आज त्याचा दहावीचा निकाल लागला. त्याला 89 टक्के पडले. ते मार्क्स किती आहेत? त्याचं करियर कसं असेल ? याबाबत मला आत्ता अजिबात टेन्शन नाही. फक्त एकच इच्छा आहे , त्यानी चांगला माणूस व्हावं. आपल्या संवेदना जागृत ठेवून जगावं. कारण करियर, पैसा या गोष्टी मिळतातच. पण संवेदना जागृत ठेवणं गरजेचं आहे. कारण संवेदनशील माणूस कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.
आज तो खुप खुष आहे. त्याला चांगले मार्क्स पडलेत. सगळेच खुष आहेत. त्याच्या आयुष्यात त्याला खुप समाधान मिळो. तो सदैव आनंदी राहो . हाच माझा आशिर्वाद आणि शुभेच्छा. आज पुन्हा एकदा माझ्यापासून लांब गेलेल्या माझ्या सगळ्या जिवलगांची आठवण येतीय. मला खात्री आहे ते सगळे जिथे आहेत तिथून त्याला आशिर्वाद देत असणार.... प्रणव पुन्हा एकदा अभिनंदन... खुप मोठा हो. बदललेल्या या नव्या जगात तुला कणखरपणे उभं रहाता यावं ही सदिच्छा.....
एकदम सुरेख लिहीलेस. छान ! आईच्या सर्व भावना पुरेपूर उतरल्या आहेत.
ReplyDelete