मना तुझे मनोगत .........
आज आशा बगे यांची एक खुप छान कथा वाचली. ''अनोळखी '' आशा बगे यांच्या सगळ्या कथा अगदी आपल्या जीवनात घडाव्यात इतक्या सहज आणि तरल आहेत. त्यांच्या कोणत्याही कथेत मुख्यत्वे स्त्रीच्या मनोव्यापाराचा विचार केला जातो. कदाचित म्हणून मला त्या जास्त आवडत असतील. ''अनोळखी'' कथेनी माझ्या आवडत्या विषयाचा वेध घेतला. आपलं मन एखाद्या डोहासारखं असत. कितीतरी वेळा मनात आलेले विचार योग्य की अयोग्य हे कळतच नाही. त्यांना थांबा म्हणलं तर ते थांबत नाहीत. कित्येकदा उगाच कातर, हळवं होत हे मन. आपल्या आजुबाजुला सगळ असूनही एकटं पाडतं. आणि अशा वेळी कोणतीही साधी गोष्ट मनाला खूप लागते. मनाच्या या डोहात माकडासारखे उड्या मारणारे काही विचार अस्वस्थ करून गेले.
रोज आपल्याला भेटणारे सगळे अचानक अनोळखी असल्यासारखे वागतात. अर्थात हा सुध्दा मनाचा खेळच असावा. कारण ज्यावेळी तीव्रतेने आपल्या मनात आग लागलेली असते , नेमकं त्याच वेळी कोणालाच वेळ नसतो. एरवी उगाच डोकं खाणारे सगळे कुठे गायब होतात काय माहिती? कित्येकदा आपलं ओळखीचं , सुरक्षित जग अनोळखी वाटू लागतं. पुन्हा एकदा पूर्णपणे अनोळखी जगात जाण्यासाठी कंबर कसली जाते. कारण अनोळखी आणि ओळखीच्या जगाला सामोरं जाण्यावाचून दुसरा पर्यायच नसतो आपल्याला.
आपण आपलं एकटच आयुष्य जगायचं असेल तर प्रेम या भावनेला काही अर्थच उरत नाही. प्रेमही व्यवहार पाहून करायचं असतं. काय वाईट दिसेल ? काय चांगलं दिसेल ? काय चौकटीत बसेल ? यावर सगळ अवलंबून आहे. अगदी मनाच्या तळातून वाटणा-या अनेक गोष्टींना अर्थच नसतो. आपण जन्म दिलेल्या आपल्या मुलांवरसुध्दा प्रेम करताना विचार करायचा असतो म्हणे. आमच्या ओळखीच्या एक आजी कायम सांगायच्या, ''आपल्या मुलांना समोरचं ताय द्याव, पण बसायचा पाट देऊ नये.'' बापरे... किती व्यवहारी प्रेम. पण काही वेळा अनुभवच माणसाला शहाणपण शिकवतो. आपल्या आजुबाजुला असणारी माणसांची फौज, ओळखी, अनोळखी सगळेच एका मर्यादेपर्यंतच असतात. म्हणजे एखाद्याला आपल्याबद्दल किंवा आपल्याला एखाद्याबद्दल कितीही वाटत असलं तरी प्रत्येकाच्या काही मर्यादाअसतात. मुलावर आईचं किती प्रेम असतं. पण तेच मुलं मोठं झालं की आईनी मन्या, पिल्या असं म्हणलेलं त्याला आवडत नाही. हल्ली मुलांना आपले पालक शाळा - कॉलेजात आलेले आवडत नाहीत. आमच्या लहानपणी आई शाळेत येत नाही म्हणून वाईट वाटायचं. म्हणजे आपल्याच मुलांवर प्रेम करायची पण एक मर्यादा आहे. ही मर्यादा ओळखली पाहिजे. तसं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्याला लहान वाटणारं आपलं पिल्लू आता मोठ्ठ झालेलं असत. बहुतांश नात्यांमध्ये ही मर्यादा येतेच. तिचा स्वीकार करणं यातच खरं शहाणपण आहे. नाहीतर आपल्याच अपेक्षांच्या ओझ्याखाली आपल्यालाच गुदमरायची वेळ येते.
तुटून आणि लुटून प्रेम करणं ही शंभरातल्या एखाद्या माणसाची गरज असू शकते. बाकीच्यांना फक्त व्यवहार हवा असतो. मग आपले शंभर टक्के उगाच वीस - तीस टक्के वाल्यांना का द्यायचे ? त्यापेक्षा खरच गरज आहे अशा ठिकाणी आपलं असणं हेच चांगल. हे सगळ कितीही म्हणलं तरी आपल्याला हव्या असणा-या गोष्टींमध्ये गुंतणं हा स्वभाव मन सोडायला तयार नाही. अशा वेळी मनाला विचारावसं वाटत, ''मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ? ''
आज आशा बगे यांची एक खुप छान कथा वाचली. ''अनोळखी '' आशा बगे यांच्या सगळ्या कथा अगदी आपल्या जीवनात घडाव्यात इतक्या सहज आणि तरल आहेत. त्यांच्या कोणत्याही कथेत मुख्यत्वे स्त्रीच्या मनोव्यापाराचा विचार केला जातो. कदाचित म्हणून मला त्या जास्त आवडत असतील. ''अनोळखी'' कथेनी माझ्या आवडत्या विषयाचा वेध घेतला. आपलं मन एखाद्या डोहासारखं असत. कितीतरी वेळा मनात आलेले विचार योग्य की अयोग्य हे कळतच नाही. त्यांना थांबा म्हणलं तर ते थांबत नाहीत. कित्येकदा उगाच कातर, हळवं होत हे मन. आपल्या आजुबाजुला सगळ असूनही एकटं पाडतं. आणि अशा वेळी कोणतीही साधी गोष्ट मनाला खूप लागते. मनाच्या या डोहात माकडासारखे उड्या मारणारे काही विचार अस्वस्थ करून गेले.
रोज आपल्याला भेटणारे सगळे अचानक अनोळखी असल्यासारखे वागतात. अर्थात हा सुध्दा मनाचा खेळच असावा. कारण ज्यावेळी तीव्रतेने आपल्या मनात आग लागलेली असते , नेमकं त्याच वेळी कोणालाच वेळ नसतो. एरवी उगाच डोकं खाणारे सगळे कुठे गायब होतात काय माहिती? कित्येकदा आपलं ओळखीचं , सुरक्षित जग अनोळखी वाटू लागतं. पुन्हा एकदा पूर्णपणे अनोळखी जगात जाण्यासाठी कंबर कसली जाते. कारण अनोळखी आणि ओळखीच्या जगाला सामोरं जाण्यावाचून दुसरा पर्यायच नसतो आपल्याला.
आपण आपलं एकटच आयुष्य जगायचं असेल तर प्रेम या भावनेला काही अर्थच उरत नाही. प्रेमही व्यवहार पाहून करायचं असतं. काय वाईट दिसेल ? काय चांगलं दिसेल ? काय चौकटीत बसेल ? यावर सगळ अवलंबून आहे. अगदी मनाच्या तळातून वाटणा-या अनेक गोष्टींना अर्थच नसतो. आपण जन्म दिलेल्या आपल्या मुलांवरसुध्दा प्रेम करताना विचार करायचा असतो म्हणे. आमच्या ओळखीच्या एक आजी कायम सांगायच्या, ''आपल्या मुलांना समोरचं ताय द्याव, पण बसायचा पाट देऊ नये.'' बापरे... किती व्यवहारी प्रेम. पण काही वेळा अनुभवच माणसाला शहाणपण शिकवतो. आपल्या आजुबाजुला असणारी माणसांची फौज, ओळखी, अनोळखी सगळेच एका मर्यादेपर्यंतच असतात. म्हणजे एखाद्याला आपल्याबद्दल किंवा आपल्याला एखाद्याबद्दल कितीही वाटत असलं तरी प्रत्येकाच्या काही मर्यादाअसतात. मुलावर आईचं किती प्रेम असतं. पण तेच मुलं मोठं झालं की आईनी मन्या, पिल्या असं म्हणलेलं त्याला आवडत नाही. हल्ली मुलांना आपले पालक शाळा - कॉलेजात आलेले आवडत नाहीत. आमच्या लहानपणी आई शाळेत येत नाही म्हणून वाईट वाटायचं. म्हणजे आपल्याच मुलांवर प्रेम करायची पण एक मर्यादा आहे. ही मर्यादा ओळखली पाहिजे. तसं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्याला लहान वाटणारं आपलं पिल्लू आता मोठ्ठ झालेलं असत. बहुतांश नात्यांमध्ये ही मर्यादा येतेच. तिचा स्वीकार करणं यातच खरं शहाणपण आहे. नाहीतर आपल्याच अपेक्षांच्या ओझ्याखाली आपल्यालाच गुदमरायची वेळ येते.
तुटून आणि लुटून प्रेम करणं ही शंभरातल्या एखाद्या माणसाची गरज असू शकते. बाकीच्यांना फक्त व्यवहार हवा असतो. मग आपले शंभर टक्के उगाच वीस - तीस टक्के वाल्यांना का द्यायचे ? त्यापेक्षा खरच गरज आहे अशा ठिकाणी आपलं असणं हेच चांगल. हे सगळ कितीही म्हणलं तरी आपल्याला हव्या असणा-या गोष्टींमध्ये गुंतणं हा स्वभाव मन सोडायला तयार नाही. अशा वेळी मनाला विचारावसं वाटत, ''मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ? ''