Wednesday, 16 January 2019


नव्या वर्षात करूया काही अवघड गोष्टी ....


नवीन वर्ष सुरु झालं... बरेच दिवसात मनापासून काही लिहाव असं वाटत नव्हत. शिवानी दीदींचा एक व्हिडीओ पहिला आणि एक मस्त विचार मिळाला. त्या म्हणाल्या, “आपण दही लावताना जुन्या, आंबट आणि खराब झालेल्या दह्याचं विरजण लावत नाही. तर नवीन दही सुद्धा खराब होऊ शकत. तसच मागील वर्षातील आंबट, कडू आठवणी मनात ठेवून नवीन वर्ष सुरु करू नका. पूणर्पणे नव्यानी वर्ष सुरु करा.” एकदम भारी विचार.
कितीही नाही म्हणल तरी आपल्या मनात अशा नकोशा आठवणी असतातच आणि आपण त्या आठवणी पुढच्या वर्षात carry forward करतोच.
पूणर्पणे नव्यानी वर्ष सुरु करा  हे म्हणणं सोपं आहे पण प्रत्यक्षात असं वागणं शक्य आहे का? जुन्या आठवणी पाठ सोडत नाहीत आणि त्या नकोशा देखील वाटतात. त्या आठवणी विसरून त्या त्या व्यक्तींशी पुन्हा नॉर्मल वागणं इतकं सोप नाही. कारण आपण सामान्य माणस आहोत. राग येण, तो मनात राहणं स्वाभाविक आहे. पण या सामान्य वाटणाऱ्या भावना मनाला खूप त्रास देतात.
त्या व्यक्तीला माफ करण शक्य नसेल तर निदान द्वेष थांबवता येईल का? कारण कोणतीही व्यक्ती कायम तशीच नसते. परिस्थिती प्रमाणे माणसात बदल होतो. या निमित्ताने अजून एक मस्त विचार मिळाला, ठराविक लोक आपल्या अपेक्षेप्रमाणे वागले नाही की respect करत नाहीत असंं वाटतंं. आपला acceptance कमी होतो. कारण हे डोक्यात जाऊन बसतं की ही व्यक्ती माझ्या अपेक्षे प्रमाणे वागत नाहीये. आपल्या मनाप्रमाणे वागले की respect. मन कमजोर असल की अहंकार असतो.  आणि आत्मसन्मान कमी होतो. ती व्यक्ती लवकर डिस्टर्ब होते. संवेदनशील असणं वेगळं, जी व्यक्ती संवेदनशील असते ती लगेच hurt होते आणि react होते, असं आजकाल बोलल जात. पण मनाची स्थिरता लवकर हलते त्यामुळे असं घडतं. जेव्हा दुसऱ्याच्या वागण्यावर माझा आनंद अवलंबून असतो, तिथेच तर प्रोब्लेम्स सुरु होतात.  कारण माझा आनंद मी माझ्यात मिळवू शकत नाही. त्यामुळे आपण  दु:खी होतो. आपला मान आणि अपमान आपण ठरवायचा. आत्म्याची ताकद वाढली की आत्मविश्वास वाढतो आणि आत्मसन्मान वाढतो.  माणसाच्या आयुष्यात सहन न होणारी दु:ख फार कमी असतात. बाकी सगळे प्रश्न आपण ओढवून घेतो. रोजच्या गोष्टीनी आपण लगेच चिडतो आणि त्याला मोठ करतो, दु:खी होतो. आपण आपला आनंद टिकवण्यासाठी आपलं मन आनंदी ठेवायचं आणि एखादी अशी व्यक्ती अआपल्या सहवासात आली जिचं मन कमजोर आहे आणि त्यामुळे ती रागवते, चिडचिड करते असं लक्षात आलं तर त्रास करून घ्यायचा नाही. कारण आपला आनंद आपल्यावर अवलंबून आहे. म्हणजे बघा किती सोप्पंं, आपल्याला राग आला तर आपलं मन कमजोर आहे आणि समोरच्याला राग आला तर त्याचं मन कमजोर आहे. या दोन्ही केसमध्ये चूक कोणाचीही नसल्यानी आनंद कमी होण्याची गरज नाही...
मला माहितीय, अवघड आहे हे, पण अवघड गोष्टी करण्यातच खरी मज्जा आहे. क्यो की, बेटा, तेरी ख़ुशी तुझमेही छुपी हुई है.....   
                                                                                                                             डॉ. विनया केसकर