उदासीत या............
उदासीत या कोणता रंग आहे? तुला ठाव नाही ,मला ठाव नाही....
तुला शब्द भेटायचे घोळक्यानी... मला मौन भेटायचे नेहमी
संदीप खरेनी लिलिलेलं आणखी एक मस्त गाणं. अगदी आपल्या सगळ्यांच्या मनःस्थितीचं वर्णन करणारं. कित्येकदा मनाची अशी अवस्था होते. मनातल्या भावनांचा जो रंग असतो तोच सगळीकडे दिसतो. परिस्थिती बदललेली असते का ? माणसं विचित्र वागत असतात का ? का सगळे आपल्या मनाचे खेळ असतात? बाहेरून विचार करणारी माणसं वेड्यात काढतात. सगळं काही छान असताना उगाच उदास व्हायला झालय काय ? असं हिणवतात. एका दृष्टीनी ते खरं पण असतं. कारण वरकरणी कोणतंही कारण नसताना ही उदासी का येते ?
एरवी सुरेल गाण्यांमध्ये रमणारं मन तिथेही रमत नाही. आजुबाजुची सगळी माणसं, त्यांचे आपल्याबद्दलचे विचार खोटे वाटायला वाटतात. सगळे नाटकी प्रेम आणि सहानुभूती का दाखवतायत ते कळत नाही. असं वाटतं. असं असेलच असंही नाही. पण त्यावेळी मनाला समजावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते ऐकत नाही. उदासीचा हा रंगच आवडायला लागतो. मनाच्या तळात काहीतरी असतं पण ते कळत नाही. व्यक्त होता येत नाही. शब्द सापडत नाहीत.
कोणाशी कसही वागलं तरी प्रश्न का निर्माण होतात ? आणि असे प्रश्न ज्यांची उत्तरं आपल्याकडे नसतात. ही हतबलता जास्त त्रासदायक वाटते. एकदा कारण कळलं की मग उपाय सापडवणं सोपं जातं. पण मनाच्या कप्प्याच्या कड्या नकळतपणे का लावल्या जातायत ? कोंडमारा का वाढतोय ? एका बिंदूवर सहन न होणारा कोंडमारा मन स्विकारतच नाही. मग व्यक्त व्हावसं वाटतं. पण कोणी समोर नको वाटतं. स्वतःशी बोलावस वाटतं. पण असं कसं स्वतःशीच बोलणार?
येतं स्वतःशी बोलता. कारण समोर असलेल्या कोणाशीही बोलून उदासीचा हा रंग फिका होत नाही. काहीही कारण नसेल तर उदासी कमी व्हायला फार त्रास होत नाही. कारण उदासी मनातलीच असते. मनानी वेगळ्या आणि हव्याश्या गोष्टींचा ध्यास घेतला की ही उदासी पऴून जाते. कारण असेल आणि ते सापडलं तर काय उदासी दूर होतेच होते. ब-याचदा अशी उदासी आल्यावर मनाला स्थिर ठेवणं अवघड जातं. पण तरी आपल्या प्रश्नांची उत्तरं आपणच शोधावीत. समोरून कोणी कितीही प्रयत्न केले तरी त्यावेळी ते नकोसे वाटतात. काही वेळा काहीही न करता बरं वाटतं. पण एक नक्की मनाला काय वाटतं तेच करावं. त्यातूनच सापडतो मार्ग... आपल्याला हवा असलेलाच मिळेल असं नाही. कारण नेमकं काय हवय हे कुठे कळत ???
उदासीत या कोणता रंग आहे? तुला ठाव नाही ,मला ठाव नाही....
तुला शब्द भेटायचे घोळक्यानी... मला मौन भेटायचे नेहमी
संदीप खरेनी लिलिलेलं आणखी एक मस्त गाणं. अगदी आपल्या सगळ्यांच्या मनःस्थितीचं वर्णन करणारं. कित्येकदा मनाची अशी अवस्था होते. मनातल्या भावनांचा जो रंग असतो तोच सगळीकडे दिसतो. परिस्थिती बदललेली असते का ? माणसं विचित्र वागत असतात का ? का सगळे आपल्या मनाचे खेळ असतात? बाहेरून विचार करणारी माणसं वेड्यात काढतात. सगळं काही छान असताना उगाच उदास व्हायला झालय काय ? असं हिणवतात. एका दृष्टीनी ते खरं पण असतं. कारण वरकरणी कोणतंही कारण नसताना ही उदासी का येते ?
एरवी सुरेल गाण्यांमध्ये रमणारं मन तिथेही रमत नाही. आजुबाजुची सगळी माणसं, त्यांचे आपल्याबद्दलचे विचार खोटे वाटायला वाटतात. सगळे नाटकी प्रेम आणि सहानुभूती का दाखवतायत ते कळत नाही. असं वाटतं. असं असेलच असंही नाही. पण त्यावेळी मनाला समजावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते ऐकत नाही. उदासीचा हा रंगच आवडायला लागतो. मनाच्या तळात काहीतरी असतं पण ते कळत नाही. व्यक्त होता येत नाही. शब्द सापडत नाहीत.
कोणाशी कसही वागलं तरी प्रश्न का निर्माण होतात ? आणि असे प्रश्न ज्यांची उत्तरं आपल्याकडे नसतात. ही हतबलता जास्त त्रासदायक वाटते. एकदा कारण कळलं की मग उपाय सापडवणं सोपं जातं. पण मनाच्या कप्प्याच्या कड्या नकळतपणे का लावल्या जातायत ? कोंडमारा का वाढतोय ? एका बिंदूवर सहन न होणारा कोंडमारा मन स्विकारतच नाही. मग व्यक्त व्हावसं वाटतं. पण कोणी समोर नको वाटतं. स्वतःशी बोलावस वाटतं. पण असं कसं स्वतःशीच बोलणार?
येतं स्वतःशी बोलता. कारण समोर असलेल्या कोणाशीही बोलून उदासीचा हा रंग फिका होत नाही. काहीही कारण नसेल तर उदासी कमी व्हायला फार त्रास होत नाही. कारण उदासी मनातलीच असते. मनानी वेगळ्या आणि हव्याश्या गोष्टींचा ध्यास घेतला की ही उदासी पऴून जाते. कारण असेल आणि ते सापडलं तर काय उदासी दूर होतेच होते. ब-याचदा अशी उदासी आल्यावर मनाला स्थिर ठेवणं अवघड जातं. पण तरी आपल्या प्रश्नांची उत्तरं आपणच शोधावीत. समोरून कोणी कितीही प्रयत्न केले तरी त्यावेळी ते नकोसे वाटतात. काही वेळा काहीही न करता बरं वाटतं. पण एक नक्की मनाला काय वाटतं तेच करावं. त्यातूनच सापडतो मार्ग... आपल्याला हवा असलेलाच मिळेल असं नाही. कारण नेमकं काय हवय हे कुठे कळत ???